Indian Army तील ३ महत्त्वाच्या पदांवर नव्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; काय आहेत बदल ?

भारताच्या सैन्यात (Indian Army) तीन महत्त्वाच्या पदांवर नव्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले आहेत. नवे अधिकारी त्यांच्या कामकाजाची औपचारिक सुरुवात १ मे रोजी करतील.

64

पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने तातडीने संरक्षणाशी संबंधित अनेक निर्णय घेतले आहेत. भारताच्या सैन्यात (Indian Army) तीन महत्त्वाच्या पदांवर नव्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले आहेत. नवे अधिकारी त्यांच्या कामकाजाची औपचारिक सुरुवात १ मे रोजी करतील. याआधी ३० एप्रिल रोजी संध्याकाळी ते आधीच्या अधिकाऱ्याकडून पदभार स्वीकारणार आहेत.

(हेही वाचा – CM Relief Fund Cell : शिबिरात एकाच दिवशी २,००० रुग्णांनी घेतला विनामुल्य आरोग्य सेवेचा लाभ)

New Project 26 5

भारतीय हवाई दलातून (Indian Air Force) एअर मार्शल एसपी धारकर ३० एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत. नवे एअर मार्शल म्हणून नर्मदेश्वर तिवारी हे पदभार स्वीकारणार आहेत. सध्या तिवारी गांधीनगर येथे असलेल्या हवाई दलाच्या नैऋत्य विभागाच्या कमांडचे प्रमुख आहेत. तिवारी यांना बढती मिळत असल्यामुळे नैऋत्य विभागाच्या कमांडची जबाबदारी तिथेच कार्यरत असलेल्या मुख्य प्रशिक्षक असलेल्या व्यक्तीला देण्याचा निर्णय झाला आहे.

लेफ्टनंट जनरल जेपी मॅथ्यू यांच्या जागेवर एअर मार्शल आशुतोष दीक्षित हे चीफ्स ऑफ इंटिग्रेटेड डीफेन्स स्टाफ कमिटीमध्ये पदभार स्वीकारणार आहेत. ते सध्या प्रयागराजच्या सेंट्रल एअर कमांडचे प्रमुख आहेत. भारताचे मिराज २००० हे लढाऊ विमान उडवण्याचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे.

लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचेंद्र कुमार निवृत्त होत आहेत. यामुळे भारताच्या नॉर्दन आर्मी कमांडची (Northern Army Command) जबाबदारी लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा हाती घेणार आहेत. नॉर्दन आर्मी कमांड ही जम्मू काश्मीर आणि लडाख तसेच सियाचीन येथील सर्व लष्करी कारवायांवर नियंत्रण ठेवते. पाकिस्तान आणि चीनच्या कारवायांना उत्तर देण्यासाठी याच कमांडकडून निर्देश दिले जातात.

लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा यांना १९ डिसेंबर १९८७ रोजी डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमीमधून मद्रास रेजिमेंटच्या दुसऱ्या बटालियनमध्ये नियुक्त करण्यात आले. त्यांच्या ३७ वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी देश आणि परदेशात विविध ऑपरेशन्समध्ये भाग घेतला आहे. त्यांनी यापूर्वी जम्मू आणि काश्मीरमध्ये ८० व्या इन्फंट्री ब्रिगेडचे नेतृत्व केले आहे. त्यांना परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक आणि सेना पदक मिळाले आहे.

लष्कराची उत्तरी कमांड ही एक विशेष महत्त्वाची युनिट आहे. हे पश्चिमेला नियंत्रण रेषा (LoC) आणि पूर्वेला लडाखला लागून आहे, जिथे भारतीय सैन्य चिनी पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) शी समोरासमोर आहे. वास्तविक, नॉर्दर्न कमांडचे सध्याचे कमांडर लेफ्टनंट जनरल सुचिंद्र कुमार ३० एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत. तसेच, पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सध्याच्या परिस्थितीत हा बदल खूप महत्त्वाचा आहे. (Indian Army)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.