महाराष्ट्रातून ताबडतोब चालते व्हा; उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा पाकिस्तानी नागरिकांना इशारा

132
Eknath Shinde : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याचा आदेश दिला आहेत. महाराष्ट्रात पाकिस्तानी नागरिक जिथे असतील तिथून पाकिस्तानात ताबडतोब चालते व्हा, अन्यथा पोलीस तुम्हाला जागेवरच ठोकतील, असा इशारा शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी २७ एप्रिलला दिला. बुलढाणा येथे आयोजित आभार सभेत ते बोलत होते. (Eknath Shinde)

(हेही वाचा – Pahalgam Attack च्या निषेधार्थ आरजेडीच्या मोर्चात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा)

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पहलगामध्ये झालेला हल्ला हा देशाच्या शत्रूने भारताच्या आत्म्यावर केलेला हल्ला आहे. पाकिस्तानचे कायमचे कंबरडे मोडून नामोनिशाण मिटवले पाहिजे, ही समस्त भारतीयांची भावना आहे. जो आमच्यावर हल्ला करेल तो संपून जाईल, आता पाकिस्तानला संपवायची वेळ आलीय, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. केंद्र सरकार काम करतंय, दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांना (Pakistani citizens) तात्काळ पाकिस्तानात जा, त्यांना आसरा देणाऱ्या सापांना बिळातून ओढून बाहेर काढू, असा इशारा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. ही देशभक्तीची लढाई आहे आणि देशाच्या सुरक्षेसाठी आमचा शिवसैनिक देशाच्या जवानासारखा लढल्याशिवाय राहणार नाही. हा शेवटचा हल्ला असेल, यापुढे हल्ला करण्याचे धाडस त्यांच्यात उरणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. ही आरपारची लढाई आहे, हा घरात घुसुन हल्ला करणारा भारत आहे, व्होट बँक आणि मतांच्या लाचारीसाठी शेपूट घालणारा भारत नाही, असे ते म्हणाले. सर्व भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी आहेत, असे ते म्हणाले.

(हेही वाचा – इराणच्या Abbas Port वर स्फोट, 5 जणांचा मृत्यू; 700 हून अधिक जखमी)

दरम्यान, रणरणत्या उन्हात हजारो बुलढाणावासीयांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी गर्दी केली होती. उपमुख्यमंत्री शिंदे या गर्दीला खास धन्यवाद दिले आणि निवडणुकीत सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. ते पुढे म्हणाले की, जेव्हा आपत्ती येते तेव्हा शिवसैनिक म्हणून सगळी टीम घेऊन तेथे मदतीसाठी धावून जातो. ज्या दिवशी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला त्याच दिवशी रात्री खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (MP Dr. Shrikant Shinde) यांची टीम श्रीनगरला पोहोचली होती. तेथे थांबलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी संपर्क साधून दिला. यात कोणी पती गमावला तर कोणी भाऊ गमावला होता, कोणी कुटुंबातील सदस्य गमावला होता, अशा या निरपराध पर्यटकांच्या मानसिक अवस्थेची मला जाणीव झाली. त्यांना मानसिक आधार आवश्यक होता. लवकरात लवकर घरी परतायचं अशी त्यांची भावना होती जी त्यांनी फोनवर व्यक्त केली. त्यामुळेच मी अस्वस्थ मनाने श्रीनगर गाठले पर्यटकांना महाराष्ट्रात परतण्यासाठी व्यवस्था केली. यातून ४५० पर्यटकांना परत आणले तर बुलढाण्यातील ५१ पर्यटक सुखरुप घरी पोहोचले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

(हेही वाचा – Jhelum River ला पूर; पाकिस्तानी माध्यमांनी भारतावर फोडले खापर)

यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय राठोड, माजी आमदार संजय रायमूलकर, आनंदराव अडसूळ, शिवसेना प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे आणि बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.