काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Attack) दहशतवाद्यांनी पीडितांचा धर्म विचारून त्यांना ठार केले. या विषयी घटनास्थळी उपस्थित मृतांच्या नातेवाईकांनी दिली. तरीही कर्नाटकातील काँग्रेसी सरकारच्या मंत्र्याने पाकिस्तानची मखलाशी केली आहे. मंत्री आरबी तिम्मापुर यांनी दहशतवाद्यांनी धर्म विचारून ठार केले नसल्याचा दावा केला. धार्मिक रंग देण्यासाठी हा प्रचार केला जात आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
मला वैयक्तिकरित्या वाटत नाही की हल्लेखोरांनी पर्यटकांचे नाव आणि धर्म विचारला असता… हे गुप्तचर यंत्रणेच्या अपयशाला धार्मिक रंग देण्यासाठी आहे. कारगिल, पुलवामा आणि आता पहलगाम (Pahalgam Attack) हे केंद्रीय यंत्रणांच्या अपयशाचे परिणाम आहेत. या हल्ल्याचा (Pahalgam Attack) वापर एखाद्या विशिष्ट धर्माला लक्ष्य करण्यासाठी केला जाऊ नये. पहलगाममध्ये कर्नाटकातील अनेक लोक मारले गेले असताना मंत्री तिम्मापूर यांनी हे विधान केले आहे आणि त्यांनी स्पष्टपणे पुष्टी केली आहे की इस्लामिक दहशतवाद्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना केवळ हिंदू असल्याने मारले, असे तिम्मापुर यांनी म्हटले. आरबी तिम्मापूर यांच्या या विधानाचा भाजपाने तीव्र निषेध केला आहे.
तिम्मापूर हे तेच मंत्री आहेत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत, कारण वाइन व्यापाऱ्यांनी त्यांच्यावर विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि दारू दुकान परवान्यांचे नूतनीकरण आणि हस्तांतरण करण्यासाठी मोठी लाच घेतल्याचा आरोप केला होता.
Join Our WhatsApp Community