Pahalgam Terror Attack : हिंदू आहात ना, मग मरायची सिद्धता ठेवा…

Pahalgam Terror Attack : पहलगाममध्ये जे घडलं त्यामुळे आपल्या सगळ्यांच्याच भावना आज अतिशय तीव्र आहेत, टोकाच्या आहेत.

446
मंजिरी मराठे

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निष्पाप हिंदूंचे जीव घेतले. (Pahalgam Terror Attack) हिंदू असणं हाच त्यांचा अपराध होता. ही वार्ता पाहिली, ऐकली आणि प्रचंड वेदना, उद्विग्नता, चीड, चिडचिड, संताप अशा भावना मनात दाटून आल्या. पण त्याचबरोबर इतकं सगळं वर्षानुवर्ष, सतत घडत असूनही आपण हिंदू म्हणून अजूनही एकत्र येऊ शकत नाही, एकदिलानं उभे राहू शकत नाही ही हतबलता पुन्हा मन अस्वस्थ करत राहिली.

हिंदूंच्या नरसंहाराची (Hindu Tourist Massacre) ही काही पहिली वेळ थोडीच आहे – पण ‘मला काय त्याचे?’ शेजाऱ्याचं घर जळतंय – जळू द्या. देश तुटतोय – तुटू द्या. मी सारी सुखं उपभोगत माझ्या घरात सुरक्षित आहे ना? पण आता तुमचं घरही तुम्हाला सुरक्षित ठेऊ शकणार नाही, अशी हिंदुस्थानातलीच नव्हे तर जगातली परिस्थिती आहे. त्यामुळे तुम्ही डावे असा, सर्वधर्मसमभावाचे सूर आळवणारे असा, भाईचाऱ्याचे समर्थक असा, ‘ती पण माणसंच आहेत ना ?’ असा कळवला येणारे असा, ‘त्यांच्या मतांमुळे आम्ही निवडून आलो’ असं म्हणणारे असा, ‘त्यांच्यासाठी’ तुम्ही काफिर आणि काफिरच आहात. काफिरांना मारा असं त्यांचा धर्मच सांगतो, अल्लाच तसं सांगून गेला आहे. त्यानं नुसतं ठार मारा असं नाही सांगितलं, पहलगाममध्ये जसं क्रूरतेनं, निर्दयपणे, निष्ठुरपणे मारलं तसं मारा. जसं मारलं सौरभ कालिया या आपल्या वीर जवानाला, जसं मारलं धर्मवीर संभाजी राजांना…

पण तुम्हाला मरायचं नसेल तर सोप्पा उपाय आहे की, त्यांच्याकडे- दयाळू आहेत ना ते – अजान म्हणा किंवा मी हिंदू नाही असं सांगा. तुम्हाला गोळ्या नाही घालणार ते. अर्थात मी हिंदू नाही, असं नुसतं सांगून होणार नाही. पुरुषांना ते सिद्ध करावं लागेल. त्यांनी पुरुषांना मारणं आणि बायकांना जिवंत ठेवणं हे काही नवीन नाही आपल्याला. पुरुष त्यांच्या काय कामाचे? त्यांची संख्या वाढवणार आहेत त्या लुटून नेलेल्या, विकलेल्या, बळजबरीनं निकाह केलेल्या हिंदूंच्या बायका. पूर्वापार हेच तर घडत आलं आहे आणि पुढेही १९२१ पासून, १९४६ पासून अगदी आत्तापर्यंत हेच घडत आहे.

‘त्यांचे’ विचार, आचार, ध्येय सुस्पष्ट आहे, प्रचंड मोठं स्वप्न आहे त्यांचं. तुम्ही हिंदू बसा हिंदुस्थान – हिंदुस्थान करत. त्यांना जगावर राज्य करायचं आहे. ते योजनाबद्ध रीतीने पावलं टाकत आहेत आणि तुम्हाला त्याचा पत्ताही लागलेला नाही. त्यांनी तुमच्या जागा ताब्यात घेतल्या आहेत, तुमचे बहुतेक व्यवसाय ताब्यात घेतले आहेत. तुमच्या खिशातला पैसा अलगद त्यांच्या खिशात जातो आहे, तुमच्या विरुद्ध त्याचा वापरही होतो आहे आणि तुम्ही हिंदू बसला आहात डावे – उजवे, पुरोगामी – प्रतिगामी खेळत. हा ब्राह्मण, हा मराठा, हा दलित हा अमका, तो ढमका हा एक खेळ. हा मराठी, तो गुजराथी, तो भैया हा दुसरा एक खेळ. सगळे व्यवसाय गुजराथला जात आहेत, महाराष्ट्राचा गुजरात होतो आहे. हे एक रडगाणं. मग तुम्ही महाराष्ट्रातली हुश्शार मंडळी काय करता आहात? अदानी, अंबानी हे गुज्जुभाई कसे खोऱ्याने कमवत आहेत, हे दुसरं रडगाणं. अहो, पण तुम्हाला कोणी अडवलं आहे, असे व्यवसाय वाढवायला? पण नाही. आम्हाला जगात काय चाललं आहे, देशात काय चाललं आहे, हिरवे ढग सगळीकडे कसे दाटून आले आहेत, काळसर्प आपल्याला कसा विळखा घालतो आहे असल्या महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ कुठे आहे? अहो इतक्या आमच्या जाती (Casteism in India), इतक्या आमच्या भाषा, इतके आमचे प्रांत, आम्ही आमची अस्मिता जपायला नको? मी मराठी असताना, मी का हिंदी शिकायची? आम्ही भांडत राहणार.

उद्या हा देशच तुमचा राहिला नाही तर ती मराठी अस्मिता (Marathi Identity), तो महाराष्ट्राचा अभिमान काय कामाचा? मुसलमानांमध्ये काही जाती नाहीत? त्यांचं आपसात वैर नाही? सगळं काही रीतसर आहे. पण जिथे धर्माचा प्रश्न येतो तिथे ते सगळे एक असतात. एक फतवा निघतो आणि प्रत्येकजण तो आदेश पाळतो. पण आपल्याकडे काय झालं आहे- आपण सारेच हुशार, विचारवंत, अभ्यासक. त्यात आपल्याला व्यक्त व्हायला समाजमाध्यम हे मोठ्ठ व्यासपीठ मिळालं आहे. त्यामुळे पंतप्रधान, गृहमंत्री, सेना अगदी साऱ्यांनाच वाईटसाईट बोलण्याचा, उपदेश करण्याचा, ते कसे चुकत आहेत ते सांगण्याचा हक्क आपल्याला मिळाला आहे. आपल्या लिहिण्याला, बोलण्याला, वागण्याला likes चं बक्षीस मिळतं ना ?

पण ज्यावेळी देशात काही भीषण घटना घडते तेव्हा आपलं कर्तव्य असतं की, राजकारण बाजूला ठेवून, आपल्या भावनांना शक्य तितका आवर घालून देशाच्या, सेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं. पहलगाममध्ये जे घडलं त्यामुळे आपल्या सगळ्यांच्याच भावना आज अतिशय तीव्र आहेत, टोकाच्या आहेत. पण उद्या काय ? ‘जन पळभर म्हणतील हाय हाय.’ उद्यापासून पुन्हा जुनं दळण. जातपात, भाषा, प्रांत वाद चालू.

बांगलादेशात हिंदूंवर (Hindus In Bangladesh) अत्याचार झाले तेव्हाही आपण झालो की अस्वस्थ. पण ते देशाबाहेर घडत होतं. त्यामुळे लवकरच आपण ते विसरलो. पण आज आपल्याच देशात, पश्चिम बंगाल मधले हिंदू आत्ताही भोगत आहेतच की ? पण ते दूर आहेत, मला काय त्याचे? सोशल मिडीयावर निषेध केला की झालं! पण हे आपल्या महाराष्ट्रातही केव्हाही घडू शकतं. पुण्यातली सारसबाग, मुंबईतले समुद्रकिनारे, रेल्वे स्थानकं पाहा. तिथली ‘त्यांची’ गर्दी पाहून धडकी भरेल तुम्हाला. त्यांची वाढत चाललेली आक्रमकता पाहा, तुम्हाला राजरोसपणे दिलं जाणारं मारण्याचं आव्हान ऐका. कृपा करा, जागे व्हा. कालच्या गोळ्यांवर तुमचं नाव नव्हतं. पण उद्या त्यावर तुमचं किंवा तुमच्या घरच्यांचं नाव असेल कदाचित. आतातरी जागे व्हा आणि कृती करा. ओम प्रमाणपत्राच्या मोहिमेत सामील व्हा. आता हिंदूंच्या पैशावर हिंदूद्रोही पोसले जाणार नाहीत, हिंदूंची हत्याकांडे होणार नाहीत हे सुनिश्चित करा. नाही जागे झालात तर मरण दाराशी उभं आहेच.. (Pahalgam Terror Attack)

(लेखिका स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष आहेत.)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.