पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (United Nations) तीव्र निषेध केला आहे. दहशतवादी कारवायांचे आयोजक, गुन्हेगार आणि वित्तपुरवठा करणाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी परिषदेच्या सदस्यांनी केली. २२ एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यात २६ जणांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले.
१५ सदस्यीय सुरक्षा परिषदेने (United Nations) जारी केलेल्या एका प्रेस निवेदनात म्हटले आहे की दहशतवाद, त्याच्या सर्व स्वरूपात आणि प्रकटीकरणांमध्ये, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी धोका निर्माण करतो. सदस्य राष्ट्रांनी या हल्ल्यातील बळींच्या कुटुंबियांना आणि भारत व नेपाळ सरकारला सहानुभूती आणि संवेदना कळवल्या आणि त्यांनी जखमी नागरिक लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थनाही केली आहे.
सुरक्षा परिषदेने (United Nations) सर्व सदस्य राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय कायदा आणि सुरक्षा परिषदेच्या ठरावांनुसार त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सर्व प्रशासकीय संस्थांशी (संबंधित) सक्रिय सहकार्यावर भर देण्यात आला आहे. परिषदेने असे नमूद केले की कोणतेही दहशतवादी कृत्य गुन्हेगारी आहे आणि ते कोणी केले, ते कुठेही असले आणि कोणत्याही प्रेरणेने केले असले तरीही ते समर्थनीय ठरू शकत नाही.
दहशतवादी हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला निर्माण होणाऱ्या धोक्यांना सर्व देशांनी तोंड देण्याची गरज असल्याचे परिषदेने (United Nations) म्हटले आहे. त्यांनी असेही म्हटले की ही कारवाई संयुक्त राष्ट्रांच्या सनद, आंतरराष्ट्रीय कायदे, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायदे, आंतरराष्ट्रीय निर्वासित कायदे आणि मानवतावादी कायद्यांनुसार केली पाहिजे.
Join Our WhatsApp Community