BSF : जम्मू काश्मीर (Jammu and Kashmir) येथील पहेलगाममध्ये (Pahelgam Terror Attack) पाकपुरस्कृत दहशदवाद्यांनी निष्पाप २६ भारतीय हिंदूची गोळ्या झाडून हत्या केली. यावेळी भारत आणि पाकिस्तानमध्ये तनावग्रस्त वातावरण आहे. दरम्यान ही घटना फिरोजपूरमधील भारत-पाकिस्तान सीमेवर (India-Pakistan border) घडली. बीएसएफ जवानाने चुकून झिरो लाईन ओलांडली. (Zero line cross) यानंतर पाकिस्तानी रेंजर्सनी (Pakistani Rangers) त्या बीएसएफ जवानाला (BSF jawan) ताब्यात घेतले आहे. (BSF)
(हेही वाचा – bandra station : महाराष्ट्रातलं तिसरं व्यावसायिक केंद्र; वांद्रे आहे कलाकारांची नगरी!)
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर झिरो लाईनवर हा प्रकार घडला. बुधवारी चुकून पाकिस्तानात घुसलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाला पाक रेंजर्सनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरा बीएसएफ आणि पाक रेंजर्समध्ये झालेल्या बैठकीत बीएसएफने आपल्या सैनिकाला परत पाठवण्याची मागणी केली. पण पाक रेंजर्सनी ती नाकारली आहे. या मुद्द्यावरून गुरुवारी २४ एप्रिलला पुन्हा बीएसएफ आणि पाक रेंजर्समध्ये महत्त्वाची बैठक झाली. पहलगामध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानबाबत घेतलेल्या निर्णयांनंतर ही धक्कादायक घडना घडल्याचे समोर आले आहे.
तसेच सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेला बीएसएफ जवान हा त्या तुकडीमध्ये आहे ही जवानांची तुकडी काही दिवसांपूर्वीच तिथे तैनात करण्यात आली आहे. सीमा रेषा ओळखता न आल्याने बीएसएफ जवान चुकून पाकिस्तानात गेला आहे. बीएसएफ जवान काटेरी तारेच्या पलीकडे असलेल्या ‘नो मॅन्स लँड’मध्ये (No Man’s Land) पिक कापणाऱ्या शेतकऱ्यांवर लक्ष ठेवत होता. त्याचदरम्यान, पाक रेंजर्सनी त्याला ताब्यात घेतले. झिरो लाईनच्या खूप आधी काटेरी तार बसवली जाते. झिरो लाईनवर फक्त खांब बसवले जातात.
(हेही वाचा – Congress नेत्याकडून दिशाभूल; Pahalgam हल्ल्यात मृत झालेल्या २६ पैकी १४ मुस्लिम!)
दरम्यान, मंगळवारी २२ एप्रिलला जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधात पुन्हा एकदा दरी निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात, दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या केली होती. त्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तानविरुद्ध संताप व्यक्त करण्यात येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community