
पहलगाम (Pahalgam Terrorist Attack) हल्ल्यानंतर भारताने कठोर कारवाई केल्यानंतर पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. भारताने पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या कठोर कारवाईच्या एका दिवसानंतरच पाकिस्तानने क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा केली आहे. पाकिस्तानने २४ किंवा २५ एप्रिल रोजी त्यांच्या विशेष आर्थिक क्षेत्रात कराची किनाऱ्याजवळ जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची अधिसूचना जारी केली आहे. (Pahalgam Terrorist Attack)
हेही वाचा-Chhattisgarh मध्ये सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांना घेरलं ; ५ नक्षलवादी ठार
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कठोर कारवाई केल्यामुळे पाकिस्तानमध्ये घबराटीचे वातावरण आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कठोर कारवाई केली असल्याने पाकिस्तानचे धाबे दणाणले आहे. अशा वेळी बिथरलेल्या पाकिस्तानने लगेच दुसऱ्याच दिवशी मिसाईल टेस्टची घोषणा केली आहे. पाकिस्तानच्या कुरापती अद्यापही कमी होत नसल्याने पाकिस्तानच्या या घोषणेनंतर भारतीय एजन्सी या चाचणीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसेच भारतीय सुरक्षा यंत्रणादेखील इतर सर्व घडामोडींवर बारीक नजर ठेवून आहेत. (Pahalgam Terrorist Attack)
हेही वाचा- Pahalgam Terrorist Attack : दहशतवादी हल्ल्यासाठी पहलगामच का ? वाचा सविस्तर …
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे पुन्हा भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. हल्ला झाल्यानंतर भारतात राहत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी बॅगा पॅक करून पाकिस्तानात जाण्यासाठी LOC वर गर्दी केली आहे. भारतीयांना बदला हवाय असा सूर देशभरातून उमटू लागला आहे. यादरम्यान, बीएसएफ केंद्राच्या एका आदेशाची वाट पाहत आहे. सूर्यास्तापूर्वी आदेश आला तर दररोज होणारा बीटिंग द रिट्रीट सेरेमनी बंद करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. (Pahalgam Terrorist Attack)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community