Indo – Pak Cricket : पहलगाम हल्ल्यानंतर भारत – पाक क्रिकेटचं काय होणार?

दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानशी क्रिकेट नको, अशी भूमिका अनेकांनी घेतली आहे.

76
Indo - Pak Cricket : आशियातील अनिश्चिततेचा क्रिकेटला बसणार आहे फटका
  • ऋजुता लुकतुके

जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम (Pahalgam) इथं २२ एप्रिलला दुपारी पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशात सगळीकडे सध्या संतापाचं वातावरण आहे. हल्लेखोर हे पाकिस्तानमधून आल्याचं केंद्रीय तपास यंत्रणांनी स्पष्ट केलं आहे. आतापर्यंत या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला असून यातील २ परदेशी नागरिक आहेत. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित ‘द रेजिस्टंस फ्रंट’नं घेतली आहे. बीसीसीआयसह (BCCI) अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. त्याचवेळी पाकिस्तान बरोबर क्रिकेट सामने खेळण्याविषयीही कडक भूमिका घेण्यात आली आहे. (Indo – Pak Cricket)

बीसीसीआयचे (BCCI) उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) यांनी या घटनेसंदर्भात संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही पीडितांसोबत असून या घटनेचा निषेध करतो, असं ते म्हणाले. बीसीसीआयनं पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणं बंद करावं का असा प्रश्न राजीव शुक्ला (Rajeev Shukla) यांना विचारण्यात आला. यावर शुक्ला यांनी आमचं सरकार जे सांगेल ते आम्ही करु, असं होतं. ‘सरकारच्या भूमिकेमुळे भारतीय संघ पाकिस्तान विरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळत नाही. यापुढे देखील द्विपक्षीय मालिका पाकिस्तान विरुद्ध खेळणार नाही,’ असं राजीव शुक्ला (Rajeev Shukla) यांनी म्हटलं. जिथे आयसीसी (ICC) स्पर्धा असतात, तेव्हा त्यांच्या नियमानुसार आम्ही खेळतो असंही शुक्ला यांनी स्पष्ट केलं. (Indo – Pak Cricket)

(हेही वाचा – Pahalgam Terror Attack : हल्ल्याच्या ठिकाणी एकही सैनिक का नव्हता; सामाजिक माध्यमांवर होत आहे चर्चा)

भारत आणि पाकिस्तान यांच्यात यापूर्वी शेवटची द्विपक्षीय मालिका २०१२-१३ मध्ये झाली होती. ही मालिका एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची होती. पाकिस्तानने त्यावेळी भारताचा दौरा केला होता. दुसरीकडे भारताने २००७ मध्ये पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका खेळली होती. तर पाकिस्तानचा संघ २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतात आला होता. (Indo – Pak Cricket)

आयसीसी चॅम्पियन्स करंडकाचं (Champions Trophy) यजमानपद पाकिस्तानकडे असताना बीसीसीआयने (BCCI) भारतीय संघ या स्पर्धेसाठी पाठवण्यास नकार दिला होता. आणि त्यामुळे भारताचे सामने यंदा दुबईत भरवण्यात आले.

दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी आहेत. महाराष्ट्रातील ६ जणांचा यामध्ये मृत्यू झाला. हा हल्ला बुधवारी दुपारी अडीच वाजता झाला. ज्यावेळी पर्यटक घोड्यावरुन एका पार्कमध्ये पर्यटनाचा आनंद घेत होते. ४ ते ५ दहशतवाद्यांनी मैदानात घुसून लोकांना त्यांचं नाव आणि धर्म विचारून त्यांच्यावर गोळ्या चालवल्या. (Indo – Pak Cricket)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.