पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दहशतवाद्यांना गंभीर इशारा दिला आहे. हल्ल्यानंतर प्रथमच पंतप्रधान मोदी जाहीर सभेत बोलत होते. बिहारमध्ये ही जनसभा आयोजित करण्यात आली होती. तिथे दहशतवाद्यांच्या विषयावर बोलताना पंतप्रधान मोदींनी खूप मोठ वक्तव्य केलं आहे. संबोधित करण्यापूर्वी आपल्या भाषणाआधी त्यांनी 2 मिनिटे मौन बाळगत पहलगाम हल्ल्यातील मृत नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर, आपल्या भाषणातून पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानाला थेट इशारा दिला आहे. (PM Narendra Modi)
हेही वाचा-Pahalgam Terrorist Attack मधील दहशतवाद्यांच्या शरीरांवर कॅमेरे, एका खास अॅपचा वापर !
पंतप्रधान मोदी म्हणाले, “22 तारखेला दहशतवाद्यांनी पर्यटकांना अत्यंत क्रूरपणे मारलं. त्यामुळे संपूर्ण देश व्यथित आहे. कोटी कोटी देशवासी दुखी आहेत. सर्व पीडित परिवारांच्या दुखात संपूर्ण देश त्यांच्यासोबत आहे. ज्या कुटुंबातील अधिक इलाज चालू आहे. ते लवकर बरे व्हावेत यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. (PM Narendra Modi)
हेही वाचा- Pahalgam Terrorist Attack : दहशतवादी हल्ल्यासाठी पहलगामच का ? वाचा सविस्तर …
“या दहशतवादी हल्ल्यात कुणी आपला मुलगा गमावला, कुणी भाऊ गमावला, कुणी जीवनसाथी गमावला आहे. कुणी बंगाली बोलत होतं. कोणी कन्नड बोलत होतं. कोणी मराठी, कोणी ओडिसा, कुणी गुजराती, तर कुणी बिहारचा लाल होता. आज त्यांच्या मृत्यूवर कारगिल ते कन्याकुमारीपर्यंत आपलं दुख एक सारखं आहे.” (PM Narendra Modi)
हेही वाचा- Pahalgam Terrorist Attack : “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” ; Amit Shah यांचा इशारा
“आपला आक्रोश एक सारखा आहे. पर्यटकांवरच हल्ला झाला नाही. देशाच्या दुश्मनांनी देशाच्या आत्म्यावर हल्ला केला आहे. मी स्पष्टपणे सांगतो, ज्यांनी हा हल्ला केला आहे, त्या दहशतवाद्यांना आणि हल्ल्याचं षडयंत्र रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा दिली जाईल. त्यांना शिक्षा देणारच. त्यांची उरलेली जमिनही नेस्तनाबूत करण्याची आता वेळ आली आहे. १४० कोटी भारतीयांची इच्छाशक्ती आतंकवाद्यांची कंबर तोडल्याशिवाय राहणार नाही.” असा गंभीर इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. (PM Narendra Modi)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community