Pahalgam Terrorist Attack : दहशतवादी हल्ल्यासाठी पहलगामच का ? वाचा सविस्तर …

Pahalgam Terrorist Attack : दहशतवादी हल्ल्यासाठी पहलगामच का ? वाचा सविस्तर ...

205
Pahalgam Terrorist Attack : दहशतवादी हल्ल्यासाठी पहलगामच का ? वाचा सविस्तर ...
Pahalgam Terrorist Attack : दहशतवादी हल्ल्यासाठी पहलगामच का ? वाचा सविस्तर ...

 

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या (Pahalgam Terrorist Attack) बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना मारलं. या घटनेनं देश हादरला असून, ‘दोषींना सोडणार नाही’ असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांनी दिला आहे. (Pahalgam Terrorist Attack)

दरम्यान, यावर आता भारताने मोठी कारवाई केली. यामध्ये सिंधू नदी पाणी करार मोडला आहे. आता यावर पाकिस्तानचे टेन्शन वाढले आहे. पाकिस्तानही भारताच्या विरोधात कारवाई करण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या भारत सरकारने यावर कोणतेही उत्तर दिलेले नाही. भारत सरकारने पाकिस्तान विरुद्ध ५ मोठे निर्णय घेतले आहेत. यात सिंधू पाणी करार मोडला आहे, तसेच अटारी इंटीग्रेटेड चेकपोस्ट तात्काळ बंद करण्यात आला आहे. (Pahalgam Terrorist Attack)

पाकिस्तानच्या नागरिकांना सार्क व्हिसा सूट योजनेअंतर्गत (SVES) भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पूर्वी जारी केलेले सर्व SVES व्हिसा आता अवैध मानले जातील आणि या व्हिसाखाली भारतात उपस्थित असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Pahalgam Terrorist Attack)

हेही वाचा-Pahalgam Terrorist Attack : कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी टीआरएफ कमांडरला घेरले …

पहलगाममधील बैसरन हे एक मोठे मैदान आहे. हे शहराच्या शहराच्या आग्नेय भागात स्थित असून, नद्या, घनदाट जंगले आणि चिखलाच्या प्रदेशातून जाणाऱ्या वळणदार ट्रेक मार्गंनी वेढलेले आहे. ट्रेकचा बराचसा भाग वाहनांसाठी योग्य नाही. मार्गाचे काही भाग अत्यंत निसरडे आहेत, एक छोटीशी चूकही पर्यटकांना खोल दरीत पाडू शकते. (Pahalgam Terrorist Attack)

हेही वाचा- Pahalgam Terrorist Attack चा पर्यटनाला फटका ; १५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट

पहलगामहून पर्यटक पायी आणि घोड्यावर बसून गवताळ प्रदेशात पोहोचतात. एखाद्या तरुणाला पहलगाम ते बैसरण चालण्यासाठी सुमारे एक तास लागेल. हा भाग पूर्णपणे वेढलेला असल्यामुळे येथे पोहोचणे सोपे नाही. पण, बैसरनमध्ये दुकान चालवणारे स्थानिक लोक अनेकदा सायकली वापरतात. अशा कठीण भूभागामुळे आपत्कालीन मदत करणाऱ्यांना किंवा सुरक्षा दलांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी किमान 30-40 मिनिटे लागतात. (Pahalgam Terrorist Attack)

हेही वाचा- Pahalgam Terrorist Attack : “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” ; Amit Shah यांचा इशारा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 5 किमी मार्गावर एकही पोलिस चौकी नाही. अडचणी असूनही दररोज शेकडो पर्यटक या 30 एकरच्या बैसरणला भेट देतात. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाच्या संलग्न द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) च्या हल्लेखोरांनी त्यांच्या स्थानिक साथीदारांच्या मदतीने परिसराची रेकी केली होती. हल्ल्यानंतर घनदाट जंगलात लपण्याची ठिकाणे उभारली होती. याचाच फायदा घेत दहशतवादी पळून गेले. (Pahalgam Terrorist Attack)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.