राज्यातील Fishermen झाले शेतकरी!

58
राज्यातील Fishermen झाले शेतकरी!
  • खास प्रतिनिधी 

राज्यातील मासेमारी करणाऱ्या कोळी समाज मंगळवार पासून शेतकारी म्हणून गणला जाईल तसेच मासेमारी हा व्यवसायाला कृषी क्षेत्राचा दर्जा मिळेल, अशी माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री निलेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. (Fishermen)

कोळी समाजाला कोणते लाभ?

मंगळवार २२ एप्रिल २०२५ या दिवशी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचे राणे यांनी स्पष्ट केले तसेच मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा मिळाल्याने कोळी समाजाला कोणते लाभ मिळतील, याची माहितीही राणे यांनी दिली. याबाबतचा शासन निर्णय लवकरच जारी केला जाईल, असेही राणे यांनी स्पष्ट केले. (Fishermen)

४.८३ लाख मच्छीमारांना फायदा

राज्यातील ४ लाख ८३ हजार मच्छीमारांना याचा फायदा होणार असून राज्याच्या मत्स्य उत्पादनामध्ये भरीव वाढ होणार. कृषी क्षेत्रास लागणारे बियाणे, ट्रॅक्टर, तिफन, पाभर, औत, खते इत्यादी करीता शेतकऱ्यांना लाभ मिळतो. त्याचप्रमाणे मच्छीमारांना मत्स्यबीज खरेदी, खाद्य खरेदी, पॅडलव्हील एअरेटर्स, एअरपंप करीता अनुदान मिळू शकेल. शीतगृह व बर्फ कारखान्याला अनुदान तसेच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीकविमाप्रमाणे मत्स्य शेतकऱ्यांना, मत्स्य संवर्धकांना मत्स्यबीजांच्या मत्स्योउत्पादनाच्या नुकसानीसाठी मत्स्य विमा योजना मिळणार. (Fishermen)

(हेही वाचा – उद्धव ठाकरे लँडस्कॅमचा बादशाह; मंत्री Ashish Shelar यांचा हल्लाबोल)

रोजगार निर्मिती

दुष्काळ किंवा अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्ती झाल्यास कृषी क्षेत्रात ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना शासनातर्फे रिलीफ पॅकेज जाहीर होत त्याचप्रमाणे मच्छीमारांना ही शासनातर्फे रिलीफ पॅकेज मिळण्यास कोळी समाज पात्र ठरेल. मत्स्यपालनाला कृषीचा दर्जा मिळाल्याने समुद्र किनारे आणि अंतर्गत भागाचा आर्थिक विकास होऊ शकतो. त्याचबरोबर रोजगार निर्माण होऊ होण्यास वाव असून यातून उत्पन्न वाढीस मदत होईल. (Fishermen)

कृषी दराने वीज

मच्छीमारांना कृषी शेतकरी झाल्याने वीज शुल्कात अनुदान तर मिळेलच पण मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा मिळाल्याने मत्स्य शेतकरी, मत्स्य संवर्धन प्रकल्प, संबंधित कारखाने, प्रक्रिया युनिट यांना कृषी दराने वीज मिळणार. मच्छीमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्य कास्तकारांना अनेक पायाभूत सुविधा व सवलतींपासून वंचित राहावे लागत होते. यापुढे राज्यात मत्स्य शेतीला कृषीचा दर्जा देऊन मच्छीमार, मत्स्यसंवर्धन व मत्स्य कास्तकारांना अनेक पायाभूत सुविधा व सवलती उपलब्ध करून देवून ग्रामीण अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण होईल, असे राणे यांनी सांगितले. मत्स्य शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दराने कर्ज सुविधा इत्यादी आणि कृषीनुसार अल्पदराने विमा संरक्षणाचा लाभ मिळणार. (Fishermen)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.