
-
ऋजुता लुकतुके
श्रेयस अय्यर आणि इशान किशन हे बीसीसीआयच्या केंद्रीय करारात परतले आहेत. गेल्या वर्षी, दोघांनाही बीसीसीआयच्या २०२३-२४ च्या केंद्रीय करारातून वगळण्यात आले होते. एकदिवसीय आणि कसोटी संघाचे कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा हे ए प्लस मध्ये राहतील. गेल्या वर्षी झालेल्या टी-२० विश्वचषकानंतर या तिघांनीही टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याच वेळी, जसप्रीत बुमराह देखील ए प्लस श्रेणीत असेल. (BCCI Central Contracts)
गेल्या वर्षी श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना केंद्रीय करारातून वगळण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे देशांतर्गत क्रिकेट न खेळणे. जर एखाद्या खेळाडूचा राष्ट्रीय संघात समावेश नसेल तर त्याने देशांतर्गत क्रिकेट खेळावे, असा आदेश बोर्डाने दिला होता. बोर्डाच्या आदेशानंतरही, श्रेयस अय्यर आणि इशान किशन त्यावेळी उर्वरित रणजी ट्रॉफीमध्ये खेळले नाहीत. (BCCI Central Contracts)
(हेही वाचा – Indian army : आता सियाचीनमध्येही थेट 5 जी नेटवर्क ; सैनिकांना कुटुंबीयांशी बोलता येणार !)
श्रेयसने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आणि गेल्या रणजी करंडकात मुंबईसाठी पाच सामन्यांमध्ये ४८० धावा केल्या. श्रेयस सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये नऊ सामन्यांमध्ये ३४५ धावा करून चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. विजय हजारे स्पर्धेत त्याने शानदार कामगिरी केली, पाच सामन्यांमध्ये त्याने ३२५.०० च्या प्रभावी सरासरीने ३२५ धावा केल्या. अय्यरने २०२५ च्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या ५ डावात ७९.४१ च्या स्ट्राईक रेटने २४३ धावा केल्या. या काळात त्याने दोन अर्धशतकेही झळकावली. त्याने अंतिम सामन्यात ६२ चेंडूत ४८ धावांची खेळी खेळली. तो स्पर्धेतील दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. (BCCI Central Contracts)
दरम्यान, बोर्डाच्या केंद्रीय करार असलेल्या खेळाडूंमध्ये ३४ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या वर्षी ३० खेळाडूंना केंद्रीय करार देण्यात आला होता. तर ग्रेड A+ मध्ये गेल्या वर्षीप्रमाणे फक्त चार खेळाडू आहेत. ग्रेड अ मध्ये ६ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या वेळी देखील या श्रेणीत ६ खेळाडू होते. तर ब मध्ये, गेल्या वेळीप्रमाणे, पाच खेळाडू आहेत आणि क मध्ये १९ खेळाडू आहेत. गेल्या वेळी १५ खेळाडूंचा समावेश होता. (BCCI Central Contracts)
(हेही वाचा – IPL 2025, Foreign Players : परदेशी खेळाडू भारतात सुट्टीला आल्यासारखे वागतात; विरेंद्र सेहवाग याचा टोला)
अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती हे पहिल्यांदाच बीसीसीआयच्या केंद्रीय करारात सामील झाले आहेत. या चौघांचाही क श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. वरुणने २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ९ विकेट्स घेतल्या. नितीशने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये त्याच्या कामगिरीने प्रभावित केले. त्याच वेळी, अभिषेक शर्माने २०२४-२५ मध्ये खेळलेल्या १२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २००.४८ च्या स्ट्राइक रेटने ४११ धावा केलेया होत्या. (BCCI Central Contracts)
या यादीत, मागील केंद्रीय करारात समाविष्ट असलेल्या ५ खेळाडूंना वगळण्यात आले आहे. ज्यामध्ये शार्दुल ठाकूर, रविचंद्रन अश्विन, जितेश शर्मा, केएस भरत आणि आवेश खान यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दरम्यान अश्विनने निवृत्तीचा निर्णय घेतला होता. केंद्रीय कराराच्या ए प्लस श्रेणीतील खेळाडूंना ७ कोटी रुपये, ए श्रेणीतील खेळाडूंना ५ कोटी रुपये, बी श्रेणीतील खेळाडूंना ३ कोटी रुपये आणि सी श्रेणीतील खेळाडूंना १ कोटी रुपये मिळतात. (BCCI Central Contracts)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community