त्रिपुरातील (Tripura) तीन बांगलादेशी चोरांपैकी दोघांना भारत-बांगलादेश सीमेजवळ स्थानिकांनी पकडले आणि मारहाण केली. २० एप्रिलची ही घटना नंदलाल दास पारा गावातील आहे. (Bangladeshi Infiltrators) गावकऱ्यांनी पकडल्यानंतर एक चोर पळून गेला, अन्य २ चोरांना गावकऱ्यांनी बीएसएफसमोरच (BSF) चोप दिला. आणि नंतर त्यांना बीएसएफच्या स्वाधीन केले. या भागात बांगलादेशी चोरांची संख्या वाढली आहे.
(हेही वाचा – देशाबाहेर जाऊन बदनामी करण्याची Rahul Gandhi यांची परंपरा चालूच; म्हणे, निवडणूक आयोगाने तडजोड केली)
स्थानिकांचे म्हणणे आहे की, या भागात कमी प्रकाश आणि घनदाट जंगल असल्याने बांगलादेशी घुसखोर सहजपणे सीमा ओलांडून राज्यात प्रवेश करतात. हे लोक चोरी करतात आणि पळून जातात आणि त्यांना पकडणे सोपे नाही.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, “२० एप्रिल रोजी सकाळी एक शेतकरी भाजीपाला गोळा करण्यासाठी गावात गेला होता आणि त्याने भाजीपाला शेताच्या जवळ जंगलाजवळ तीन अनोळखी लोक बसलेले पाहिले. संशयास्पदरित्या, गावकरी जमले आणि त्यांनी भाजीपाला शेत आणि जंगलाला वेढा घातला.” (Bangladeshi Infiltrators)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community