– नित्यानंद भिसे
पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सलग चौथ्यांदा निवडणूक लढाई जिंकण्यासाठी पूर्णपणे सक्रिय झाल्या आहेत. वक्फ सुधारणा कायद्याबाबत ममता उघडपणे मुसलमानांच्या बाजूने उभ्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये वक्फ कायदा लागू न करण्याची घोषणा केल्यानंतर, ममतांनी बुधवारी मशिदीतील इमाम, मुएझिन आणि मुसलमानांना भेटल्या. यावेळी ममतांनी वक्फ कायद्याबाबत मोदी सरकार आणि भाजपावर जोरदार निशाणा साधला.
पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि ममता बॅनर्जी यांना राज्यातील मुसलमानांच्या मतपेटीवर मजबूत पकड कायम ठेवायची आहे. अशा परिस्थितीत, ममतांनी वक्फ कायद्याविरुद्ध निषेध करणाऱ्या मुसलमानांच्या पाठिशी उघडपणे उभे राहण्याची घोषणा केली आहे. ममता बॅनर्जी यांनी बुधवारी बंगालमधील इमाम आणि मौलवींना सांगितले की, मोदी सरकारने वक्फ कायद्यात सुधारणा करून संविधानाशी छेडछाड केली आहे, परंतु आम्ही कोणत्याही परिस्थितीत बंगालमध्ये (West Bengal) तो लागू होऊ देणार नाही याची खात्री बाळगा.
बंगालमधील मुस्लिम राजकारण समजून घ्या
पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) ३० टक्के मुसलमान मतदार आहेत, ज्यांचा सुमारे १०० ते १२० विधानसभा जागांवर प्रभाव आहे. या जागांवर, बंगालच्या मुर्शिदाबाद, मालदा, उत्तर दिनाजपूर, दक्षिण दिनाजपूर आणि दक्षिण २४ परगणा जिल्ह्यांमध्ये मुसलमान मतदारांची संख्या ४० टक्क्यांहून अधिक आहे. मुर्शिदाबादमध्ये सुमारे ७० टक्के मुसलमान मतदार आहेत आणि मालदामध्ये ५७ टक्के मुसलमान मतदार आहेत. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ३४ विधानसभेच्या जागा आहेत. अशाप्रकारे, ममता बॅनर्जी यांनी मुसलमान मतांवर आपली पकड टिकवून ठेवण्यासाठी रणनीती अवलंबली आहे.
(हेही वाचा Murshidabad Violence : झियाउल शेखला अटक; हिंदू पिता-पुत्राची हत्या करण्यासाठी मुसलमानांना चिथवले होते)
पश्चिम बंगाल (West Bengal) हे कदाचित एकमेव राज्य आहे जिथे मुसलमान मते आहेत. मुस्लिम व्होट बँक मिळवण्यासाठी ममता बॅनर्जी कोणतीही किंमत मोजायला तयार आहेत. २०१० पूर्वी बंगालमधील मुसलमान मतदार काँग्रेस आणि डाव्यांशी जोडलेले होते, परंतु २०११ पासून ते ममता बॅनर्जी यांनी ती आपल्याकडे वळवली.
मुसलमानांचे तुष्टीकरण ममता बॅनर्जींना महागात बसणार
ममता बॅनर्जी ज्या पद्धतीने मुसलमान मतपेटीवर लक्ष ठेवून आहेत, ते काँग्रेस आणि डाव्या राजकारणासाठी निश्चितच चिंतेचे कारण ठरू शकते, परंतु मुस्लिम मतपेढीच्या साहाय्याने भाजपावर मात करणे सोपे नाही. मुर्शिदाबाद हिंसाचाराचे निमित्त करून, भाजपा तृणमूल काँग्रेसवर हल्ला करत आहे. विरोधी पक्षांवर मुस्लिम तुष्टीकरणाचे आरोप करून भाजपाने हिंदू व्होट बँक मजबूत केली आणि त्या जोरावर उत्तर प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवले. भाजपाने सपा आणि राजदवर मुसलमान तुष्टीकरण करणारे पक्ष असा आरोप केला आहे. आजपर्यंत ते त्यातून बाहेर पडू शकलेले नाही. काँग्रेसपासून ते सपा, राजदपर्यंत अनेक विरोधी पक्ष हिंदूविरोधी असल्याचे भाजपाने सिद्ध केल्याने ते पक्ष त्यातून बाहेर पडू शकले नाहीत, या रणनीतीअंतर्गत, भाजपा पश्चिम बंगालमधून (West Bengal) तृणमूल काँग्रेसला सत्तेपासून दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. २०२६ ची पश्चिम बंगालमधील (West Bengal) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी वक्फ सुधारणा कायद्याचे शस्त्र म्हणून वापर करत आहेत. त्याचा ममता ममता बॅनर्जींना फारसा फायदा होणार नाही, कारण भाजपाने तिथे हिंदूंचे संघटन सुरु केले आहे.
Join Our WhatsApp Community