मध्य रेल्वेवरील शीव स्थानकासमोरील वाहतूक पूल (Sion Bridge) गेल्या आठ महिन्यांपासून बंद आहे. धारावीतून (Dharavi) स्थानकात जाणारा भुयारी मार्गही बंद करण्यात आला आहे. यापूर्वी स्थानकातून बाहेर पडण्यासाठी उपलब्ध असलेले अनेक मार्ग पूल पाडण्याच्या कामामुळे बंद झाले आहेत. परिणामी, प्रवाशांना ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. धारावीकडे जाण्यासाठी खुल्या मार्गावरील दोन जिन्यांपैकी एक बंद करण्यात आला आहे. त्यामुळे एकमेव जिन्यावरून प्रवाशांची कसरत सुरू आहे, ज्यामुळे प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.
(हेही वाचा – Dilip Gupte Road : दिलीप गुप्ते यांच्या नावासमोर लेफ्टनंद लिहायला महापालिका विसरली, नामफलक असेच लावले!)
स्थानकासमोरील रस्त्यावर रिक्षा आणि टॅक्सीचालकांची गर्दी रस्ता अडवते, त्यातून प्रवाशांना कसाबसा मार्ग काढावा लागतो. फलाट क्रमांक १ आणि २ वर एकाच वेळी गाड्या आल्यास प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. वृद्ध, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, विद्यार्थी आणि अपंग व्यक्तींना या गर्दीतून वाट काढणे अशक्य होते. जिन्याजवळ सरबत विक्रेते आणि इतर विक्रेते बसल्याने प्रवाशांना मोठा अडथळा निर्माण होतो. या विक्रेत्यांना हटकल्यास ते प्रवाशांवर हल्ला करतात, ज्यामुळे प्रवासी निमूटपणे निघून जातात. पोलिसांनी (Police) यावर कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत. (Sion Bridge)
एकाच जिन्यावरून प्रवासामुळे गर्दी ओसंडून वाहत आहे, ज्यामुळे चेंगराचेंगरीची भीती आहे. काही वर्षांपूर्वी एल्फिन्स्टन स्थानकातील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता समाजसेवक गणेश खाडे (Ganesh Khade) यांनी व्यक्त केली. “प्रशासन दुर्दैवी घटनेची वाट पाहत आहे का?” असा सवाल त्यांनी केला. वाहतूक पुलाचे काम लवकर पूर्ण करावे आणि पर्यायी मार्ग उपलब्ध करावेत, अशी मागणी प्रवासी करत आहेत. (Sion Bridge)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community