“बाळासाहेब असते तर यांना चाबकाने फटकारलं असतं” ; Eknath Shinde यांचा ठाकरेंवर घणाघात

"बाळासाहेब असते तर यांना चाबकाने फटकारलं असतं" ; Eknath Shinde यांचा ठाकरेंवर घणाघात

195
"बाळासाहेब असते तर यांना चाबकाने फटकारलं असतं" ; Eknath Shinde यांचा ठाकरेंवर घणाघात

शिवसेना ठाकरे गटाचा नाशिकमध्ये निर्धार मेळावा पार पडला. यावेळी मेळाव्याच्या सुरुवातीला ठाकरे गटाकडून बाळासाहेब ठाकरे यांचे एआयमार्फत भाषण सादर केल्याचं पाहायला मिळालं. यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. ते त्यांच्या मुळगावी दरेगाव येथे बोलत होते. (Eknath Shinde)

हेही वाचा-मुंबईकरांनो, रविवारी घराबाहेर पडताय? तर Mega Block चे ‘हे’ वेळापत्रक वाचाच

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, “विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी शिक्कामोर्तब केलं, नकली लोकांना नाकारलं आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेणाऱ्यांना स्विकारलं. इतिहास गद्दारांना कधीच माफ करणार नाही हे बरोबर आहे, ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली, ज्यांनी बाळासाहेबांशी बेमानी केली गद्दारी केली त्यांना इतिहास कधीच माफ करणार नाही. साहेबांनी सांगितलं होतं काँग्रेस सोबत जायचं नाही हे काँग्रेस सोबत गेले.” (Eknath Shinde)

हेही वाचा- Most Powerful Countries : जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानावर

“साहेबांचे नकली खोटे आवाज काढून कोणी लोक यांच्याकडे येणार नाहीत. जर असली असाल तर तुम्हाला नकली आवाज काढण्याची गरज काय? हा पोरकटपणा आहे, हा थिल्लार पणा आहे. बाळासाहेबांना वेदना देण्याचं, बाळासाहेबांचा अपमान करण्याचं हे काम आहे. साहेब असते तर त्यांनी त्यांना चाबकाने फटकारलं असतं.” असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. (Eknath Shinde)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.