Raj Thackeray : राज्यात येत्या जूनपासून २०२० नवीन शैक्षणिक धोरण (New Education Policy) लागू होत आहे. परिणामी या वर्षी इयत्ता पहिलीपासूनच हिंदी भाषा (Hindi language) अनिवार्य करण्यात आली आहे. यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे तीव्र शब्दात कडाडले आहेत. त्यांनी तीव्र शब्दात शैक्षणिक धोरणातील एका तरतुदीचा निषेध केला आहे. एक्स (X) सोशल मीडिया (Social media) अकाऊंटवरून ठाकरे यांनी पोस्ट केली आहे. (Raj Thackeray)
राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही.
केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र ‘हिंदीकरण’ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते या राज्यात आम्ही…
— Raj Thackeray (@RajThackeray) April 17, 2025
(हेही वाचा – छत्रपती संभाजीनगरात राजनाथ सिंह यांच्या हस्ते Maharana Pratap पुतळ्याचे अनावरण)
मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्सच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला आहे. म्हणाले की, “सरकारचं सध्या जे सर्वत्र ‘हिंदीकरण’ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची ? तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे, ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका. या देशात भाषावार प्रांतरचना झाली, आणि ती इतकी वर्ष टिकली. पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरु झालेत? भाषावार प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जात आहे” अशा तीव्र शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community