शिवसेना उबाठाने आता शिवसेना शिंदे गटावर टीका करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. उबाठाने AI च्या माध्यमातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजाचा वापर करून शिंदे गटावर टीका करणारे भाषण तयार केले. नाशिक येथे शिवसेना उबाठाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी हा AI भाषणाचा ऑडिओ असलेला आणि त्यानुसार प्रसंग घेऊन तयार केलेला व्हिडीओ दाखवण्यात आला.
पूर्वीचा शिवसैनिक राहिलेला नाही, मुंबईसाठी १०६ हुतात्मा गेले, मी सळसळत्या रक्ताची पिढी निर्माण केली ती आता गेली कुठे, असे या व्हिडिओत म्हटले. या व्हिडिओमध्ये शिवसेना-भाजपाची युती तुटली त्यावरही भाष्य करण्यात आले आहे. त्यांना आम्ही वाढवले आता त्यांना खांदा देण्याची वेळ आली आहे, असेही या AI व्हिडिओत म्हटले आहे. व्हिडिओमध्ये शिंदे गटावर बरेच आरोप करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना गद्दार म्हटले. असे गद्दार गेले तर जाऊ द्या, ही शिवसेना कधी संपणार नाही, असेही या व्हिडिओत म्हटल्याचे दिसत आहे.
(हेही वाचा Muslim : अशरफने सुमित बनून हिंदू मुलीचे १३ वर्षे केले लैंगिक शोषण; गोमांस खाण्यासाठी केली जबरदस्ती)
शिवसेना उबाठाच्या शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी उबाठाला असा हास्यास्पद प्रयत्न करावा लागला आहे. बाळासाहेबांच्या बनावट आवाजात उद्धव ठाकरे यांचे विचार मांडण्यात आले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. यामुळे बाळासाहेबांची बदनामी झाली आहे. हिंदुत्वाला तिलांजली देऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत सत्ता स्थापन केल्यावर बाळासाहेबांनी कशी खरडपट्टी काढली असती, हे जुने शिवसैनिक सांगू लागले आहेत. एकूणच AI च्या माध्यमातून बाळासाहेबांचा आवाज घेऊन उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकवण्याचा प्रयत्न हा केविलवाणा वाटल्याचे अनेक जण म्हणत आहेत.
Join Our WhatsApp Community