विधानसभेत Love Jihad आणि anti-conversion विधेयके चर्चेला!

163
दारू पिऊन अश्लील चाळे करणे होणार non-bailable offence?

सुजित महामुलकर

Love Jihad : भाजपाचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी राज्यात ‘लव्ह जिहाद’विरोधी (Love Jihad) तर राज्याचे माजी मंत्री आणि भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी धर्मांतरविरोधी कायदा (anti-conversion) करण्याबाबतचे अशासकीय विधेयक शुक्रवारी ७ मार्च २०२५ या दिवशी विधानसभेत मांडले.  (Love Jihad)

मंजूर, नामंजूर किंवा मागे
या दोन्ही विधेयकांवर पुढील आठवड्यात चर्चा होऊन ते मंजूर केले जाईल, नामंजूर होईल किंवा मागे घेतले जाईल. सर्वसाधारणपणे अशासकीय विधेयकावर चर्चा होते आणि त्यानंतर सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन सरकारकडून उत्तर देण्यात येते. सरकारच्या उत्तराने संबंधित सदस्याचे समाधान झाल्यास मंत्री त्या आमदाराला आपले विधेयक मागे घेण्याची विनंती करतात आणि त्यानंतर आमदार विधेयक मागे घेतात.

(हेही वाचा – राज्यभरात विशेष ग्रामसभा होणार; Women’s Day निमित्त राज्य महिला आयोगाचा पुढाकार)

१ वर्षे कारावास किंवा पाच हजार दंड
शुक्रवारी मांडण्यात आलेली दोन्ही विधेयके एकमेकांशी निगडित असून दोन्ही विधेयके भाजपाच्याच आमदारांनी प्रस्तावित केलेली आहेत. मुनगंटीवार यांनी मांडलेल्या विधेयकामध्ये सक्तीने, प्रलोभन दाखवून किंवा कपटी मार्गाने धर्मांतर करून घेणाऱ्या दोषी व्यक्तीस १ वर्षांपर्यंत कारावास (imprisonment) किंवा पाच हजार रुपयांपर्यंत दंड (fine) आकरण्याची तरतूद करण्याची सूचना मांडली आहे.

३ वर्षे कारावास किंवा ५०,००० दंड
दरम्यान, भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी प्रस्तावित केलेल्या ‘लव्ह जिहाद’ संबंधित विधेयकामध्ये थोडी कडक शिक्षेची तरतूद करून सुधारणा सुचवली आहे. यांच्या विधेयकामध्ये सक्तीने, प्रलोभन दाखवून किंवा कपटी मार्गाने धर्मांतर करून घेणाऱ्या दोषी व्यक्तीस ३ वर्षांपर्यंत कारावास किंवा ५०,००० रुपयांपर्यंत दंड आकरण्याची तरतूद सुचवली आहे.

(हेही वाचा – CC Road : प्रभादेवीतील रामभाऊ देसाई मार्गाच्या सिमेंट काँक्रिटीकरणात झाडांची मुळे कापली; कंत्राटदाराला २० हजारांचा दंड)

समाजाचे संतुलन बिघडते
दोन्ही विधेयकामध्ये भातखळकर आणि मुनगंटीवार यांनी हे विधेयक का आणले आणि त्याचा उद्देश व कारण देण्यात आले आहे. “मुळातच धर्मांतर म्हणजे एखाद्याच्या श्रद्धेला धक्का पोहोचविणे होय. एखाद्याला प्रलोभन दाखविणे, बळजबरी करणे, कपट करणे किंवा त्याच्या दारिद्र्याचा गैरफायदा घेणे या मार्गाचा अवलंब करून धर्मांतर घडवून आणले जाते तेव्हा धर्मांतराची ही पद्धत अधिकच आक्षेपार्ह ठरते. वरील पद्धतीने धर्मांतर केल्यामुळे किंवा धर्मांतराचा प्रयत्न केल्यामुळे अनेक प्रकारे समाजाचे संतुलन तर बिघडतेच पण त्याच बरोबर कायदा व सुव्यवस्थेच्याही समस्या निर्माण होतात व प्रत्यक्षरित्या धार्मिक स्वातंत्र्यावर आक्रमण होते. म्हणून अशा कार्यक्रमांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करणे इष्ट ठरते. वरील उद्दिष्टे साध्य करणे हा या विधेयकाचा हेतू आहे,” असे या दोन्ही सदस्यांनी कारण दिले आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.