लग्न समारंभ आटोपून परतत असताना भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

107
लग्न समारंभ आटोपून परतत असताना भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
लग्न समारंभ आटोपून परतत असताना भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी ते दर्यापूर मार्गावरील इटकी फाट्याजवळ सोमवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. मृतकांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असून हे सर्वजण अमरावती येथून लग्न समारंभ आटोपून परतत होते. दरम्यान अपघातात ६ जण जखमी झाले असून त्यांच्यावर अमरावतीतील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे.

(हेही वाचा – मुंबई-नागपूर महामार्गावर ट्रक आणि एसटीचा भीषण अपघात; ५ ठार १३ जखमी)

दर्यापूर येथील एकाच कुटुंबातील १२ जण लग्न कार्यासाठी अंजनगाव सूर्जी येथे गेले होते. लग्न कार्य (वलीमा) आटोपून ते दर्यापूरकडे परत येत असताना इटकी फाट्याजवळ विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेत तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान सर्व जखमींना तातडीने दर्यापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे दर्यापूरवरून ९ जणांना अमरावती पाठविण्यात आले. जखमींना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी एका अडीच वर्षाच्या चिमुकलीसह दोघांना मृत घोषित केले. त्याचवेळी उर्वरित ६ जखमींवर सध्या शहरातील पीडीएमसी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात झाल्याची माहिती मिळतात खल्लार पोलिसांसह ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतक आणि जखमी एकाच कुटुंबातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.