विरारमध्ये रेल्वे रुळ ओलांडताना एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू!

89

विरार स्थानकात शुक्रवारी सकाळी दुर्दैवी घटना घडली आहे. विरार स्थानकाजवळ रेल्वे रुळ ओलांडताना एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात पती-पत्नीसह ३ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. रेल्वे रुळ ओलांडू नका असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून वारंवार केले जात असते तरीही दिवसेंदिवस रेल्वे रुळ ओलांडताना अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

( हेही वाचा : हसन मुश्रीफांना ईडीकडून नवे समन्स! मनी लॉंड्रिंग प्रकरणात होणार चौकशी )

आसनगाव रेल्वे स्थानकात गुरूवारी अपघात 

दरम्यान गुरूवारी सुद्धा आसनगाव रेल्वे स्थानकात लोकलच्या धडकेत वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. आसनगाव रेल्वे स्थानकात २०१८ मध्ये तोडण्यात आलेला ब्रीज अद्याप बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे या मार्गावरील अपघातांची मालिका थांबत नसून वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासन आता यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.