Nitesh Rane : नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंविषयी केला गौप्यस्फोट; म्हणाले…

बीडमध्ये झालेल्या सभेत ठाकरे गटाचे किती लोक होते? ही सभा ठाकरे गटाची होती की राष्ट्रवादी काँग्रेसची होती हे त्यांनी सांगावे, असे नितेश राणे म्हणाले.

145

भाजप नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. काल बीडमध्ये शिवसेना ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा पार पडली, या सभेवरून नितेश राणे यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. बीडमध्ये झालेल्या सभेत ठाकरे गटाचे किती लोक होते असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. तसेच त्यांनी उद्धव ठाकरेंबाबत बोलताना मोठा गौप्यस्फोट देखील केला आहे.

नेमके काय म्हणाले राणे?

नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. बीडमध्ये झालेल्या कालच्या सभेत ठाकरे गटाचे किती लोक होते? ही सभा ठाकरे गटाची होती की राष्ट्रवादी काँग्रेसची होती हे त्यांनी सांगावे. सभेला पाचची वेळ देण्यात आली सभा आठला सुरुवात झाली. रॅलीमध्येही सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते. आर्ध्या खुर्च्या रिकाम्या दिसल्यानंतर राष्ट्रवादीला फोन करून विनंती करण्यात आली, असा खोचक टोला नितेश राणे यांनी ठाकरे गटाला लगावला आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंबद्दल देखील मोठा गौप्यस्फोट केला आहे. गोपीनाथ मुंडे असताना उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनायचे होते म्हणून युतीची सत्ता गेली. हे खरे आहे की नाही हे संजय राऊत यांनी सांगावे, असे नितेश राणे यांनी म्हटले.

(हेही वाचा The Kerala Story : चित्रपटाच्या प्रदर्शनावरून पुण्यातील FTII मधील विद्यार्थ्यांमध्ये वाद; शो बंद करण्याची मागणी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.