ठाकरे गटाच्या आरोपावर शरद पवार म्हणाले, ‘सामना अग्रलेखाला महत्त्व देत नाही’

135
ठाकरे गटाच्या आरोपावर शरद पवार म्हणाले, 'सामना अग्रलेखाला महत्त्व देत नाही'
ठाकरे गटाच्या आरोपावर शरद पवार म्हणाले, 'सामना अग्रलेखाला महत्त्व देत नाही'

शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले, असा थेट आरोप ठाकरे गटाच्या सामना या मुखपत्रातील अग्रलेखातून सोमवारी करण्यात आला होता. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला. आता या विषयावर खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार बोलले आहेत. हा आमच्या घरातला प्रश्न आहे. सामना अग्रलेखाला महत्त्व देत नाही, असे सडेतोड उत्तर शरद पवारांनी दिले आहे.

(हेही वाचा – अनिल परब यांच्या अडचणीत वाढ; ‘या’प्रकरणात पीएमएलए न्यायालयात आरोपपत्र दाखल)

शरद पवार नक्की काय म्हणाले?

मंगळवारी, ९ मेला प्रसार माध्यमांसोबत बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘आम्ही पक्षात काय करतो, हे राऊतांना माहित नाही. आम्ही काय केलं ते त्यांना माहित नाही. पक्षातील अनेक नेत्यांना कॅबिनेट मंत्री करून संधी दिली आहे. पण आम्ही कोणाला संधी दिली आणि काय केले हे जाहीर करत नाही. त्यामुळे कुणी आमच्यावर टीका केली तर दुर्लक्ष करतो. आम्ही कधी प्रसिद्धी नाही करत. सामना अग्रलेखाला महत्त्व देत नाही. आम्ही काय करतो हे आम्हाला ठाऊक आहे. पक्षात काय होत तो आमच्या घरातला प्रश्न आहे. आम्ही आमचे काम करतो त्यांनी काहीही लिहू दे.’

‘आम्ही काय केले हे त्यांना माहित नाही. आमचं एक वैशिष्ट आहे. आम्ही राष्ट्रवादीचे जे सहकारी त्यांच्यासोबत अनेक गोष्टी बोलतो, वेगवेगळी मतही असतात, पण बाहेर जाऊन आम्ही त्यांची कधी प्रसिद्धी करत नाही. हा आमच्या घरातला प्रश्न असतो. आणि घरामध्ये आमच्या प्रत्येक सहकार्याला ठाऊक आहे की, आपला पक्ष पुढे कसा जाणार आहे, नवीन नेतृत्वाची फळी यापक्षात कशी तयार केली जाते, याची खात्री पक्षातील सर्व सहकार्याला आहे,’ असे शरद पवार म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.