“उद्धव ठाकरे सर्वात मोठे नेते, सर्वांच्या मनात भीती…” राज ठाकरेंच्या सभेनंतर काय म्हणाले संजय राऊत?

75

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढीपाडवा सभा मुंबईतील शिवाजी पार्कवर घेण्यात आली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरेंमुळेच शिवसेनेवर ही परिस्थिती ओढवली आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.

( हेही वाचा : नागपूरमधील पाकिस्तान कनेक्शन, NIA ची धाड! धक्कादायक माहिती उघड )

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत म्हणाले, “राज ठाकरेंचे भाषण मी बघितले नाही. सकाळी मी काहीतरी वाचलं. त्यांच्या पक्षाला आता १८ वर्ष झाली आहेत. त्यांचा पक्ष वयात आला आहे पण त्यांचं काय सुरू आहे मला माहिती नाही. मी फक्त आमच्या पक्षाचा विचार करतो. १८ वर्षांनी सुद्धा ते उद्धव ठाकरेंवर बोलत आहे. उद्धव ठाकरे हे खूप मोठे नेते आहेत. एकनाथ शिंदे, नारायण राणे, भाजपा, राज ठाकरे सगळे केवळ उद्धव ठाकरेंविषयीच बोलत असतात. याचाच अर्थ त्यांच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दल भीती आहे.” अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंच्या गुढीपाडवा मेळाव्यानंतर संजय राऊतांनी दिली आहे.

पुढे ते म्हणाले, उद्धव ठाकरेंनी कुठेही सभा घेतली तरी एकनाथ शिंदे गटाचे वऱ्हाड मागे येत. त्यामुळे कोण काय बोलतंय याकडे आम्ही लक्ष देत नाही, आम्हाला आमची ताकद माहिती आहे. असेही संजय राऊतांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.