बारसूमध्ये रिफायनरीसाठीचे सर्वेक्षण थांबवा; अजित पवारांची मागणी

131
अजित पवार

रत्नागिरीतील बारसू रिफायनरी सर्वेक्षणाविरोधात आंदोलन करणाऱ्या स्थानिक भूमीपूत्रांची, आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांची पोलिसांकडून मुस्कटदाबी सुरु आहे. आंदोलकांना अटक करण्यात येत आहे. पत्रकारांना धमकावण्यात येत आहे. त्याचा निषेध करीत विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी हे सर्वेक्षण थांबवण्याची मागणी केली आहे.

( हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीच्या सुट्टीवर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण)

अजित पवार यांची मागणी 

लोकशाही व्यवस्थेत शांततामय मार्गानं आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार असून राज्य सरकारने आंदोलकांच्या भावनांचा आदर करावा, पोलिसांची दडपशाही थांबवावी, बारसू रिफायनरी आंदोलन मानवी दृष्टीकोनातून संवेदशीलपणे हाताळावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.

( हेही वाचा : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकासह ‘या’ तीन ठिकाणी ‘मोडी लिपी स्पर्धा २०२३’ चे आयोजन)

बारसू रिफायनरी सर्वेक्षण 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नेहमीच विकासाची भूमिका घेतली आहे, परंतु विकास सर्वांना विश्वासात घेऊन केला पाहिजे. स्थानिक भूमीपूत्रांच्या हितांचं, हक्कांचं रक्षण झालं पाहिजे. स्थानिक भूमीपुत्रांच्या मनातल्या शंका-कुशंका दूर करुन त्यांना विश्वासात घ्यावं. स्थानिक ग्रामस्थ, तरुण, महिलावर्गावर पोलिसांकडून दडपशाही करण्यापेक्षा समन्वय, संवादातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा. संवादातून मार्ग निघेपर्यंत बारसू रिफायनरी सर्वेक्षण थांबवावं, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.